परभणी, २४ ऑक्टोबर २०२५ – समाजसेवेसाठी कार्यरत जीवन दूत या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज परभणी येथे गरजू नागरिकांसाठी फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मोहसीन खान , विश्वस्त मंडळाचे सदस्य, कार्यक्रमाचे आयोजक (Programme Manager)तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य संघटक शेख आयुब शेख रशीद आतार ,महिला संघटक आफ्रिन शेख आयुब व अफ्रिन सुलतान शेख कलीम व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा उद्देश गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यदायी आणि पौष्टिक आहार पोहोचविणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान सफरचंद, केळी, संत्री, पेरू आणि इतर हंगामी फळांचे वितरण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मोहसीन खान (एम जे मास मीडिया ) म्हणाले, “आरोग्य हेच खरे धन आहे. आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.”
स्थानिक नागरिकांनीही या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. लवकरच संस्थेकडून अशाच आणखी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.
www.jeevandoot.org.in





