April 19, 2026 2:59 pm

November 2025

शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रमुख डॉ. सदानंद दाते आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा ग्लोबल पीस ऑनरने सन्मान 

मुंबई, दि. २२ – दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग आणि सतर्क असले पाहिजे. कान आणि डोळे बनून सुरक्षेचे काम केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिवीजा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल पीस ऑनर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख डॉ. सदानंद दाते, एनएसजी कमांडो सुनिल जोधा, रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांना ग्लोबल पीस ऑनर सन्मानाने गौरवण्यात आले.

26/11 या काळजाला भिडणाऱ्या घटनेला 17 वर्षे झाली असली तरी त्या दिवसाची वेदना आजही आपणा सर्वांच्या मनात कायम असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईसह देशभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली देण्यासाठी आणि हुतात्म्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. पहलगाम येथे निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवादी संघटना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा घटनांवरून आजही दहशतवादाचा धोका कायम असल्याचे स्पष्ट होत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 26/11 चा हल्ला हा ताज किंवा मुंबईपुरता मर्यादित नव्हता. जसा अमेरिका ’ट्विन टॉवर’ हल्ला म्हणजे अमेरिकेच्या सार्वभौमत्वावरील हल्ला होता, तसाच 26/11 चा हल्ला हा संपूर्ण भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेला मोठा धक्का होता. त्या काळात ठोस प्रतिउत्तर दिले असते तर कदाचित पुन्हा असा हल्ला झाला नसता. परंतु आता परिस्थिती बदलली असून भारत मजबूत, सक्षम आणि निर्णायक देश म्हणून जगासमोर उभा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करत जगाला आपली क्षमता दाखवून दिली. भारत निर्णायक कारवाई करणारा देश आहे. आज देशाची सुरक्षा यंत्रणा अत्यंत मजबूत झाली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ आणि शस्त्रे जप्त करून मोठा कट उधळून लावला आहे.

दहशतवादी सरळ युद्ध करू शकत नाहीत म्हणून छुपे युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाने सतत जागरूक राहणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे, मेजर उन्नीकृष्णन आणि प्रकाश मोरे यांसह सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन करतो.

“मुंबईची संस्कृती खंबीर आहे; ती थांबत नाही, खचत नाही” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 26/11 हल्ल्यात मुंबईची संस्कृती, तिचा आत्मा आणि तिची ओळख लक्ष्य करण्यात आली होती. पण मुंबई थांबली नाही आणि खचली नाही. आपण या हल्ल्याला ठाम प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेले उत्तर हे देशाच्या बदललेल्या सामर्थ्याचे द्योतक आहे.

सदानंद दाते आणि नीता अंबानी यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, “अशा व्यक्तींचा देशाला अभिमान आहे.”

कार्यक्रमात 26/11 हल्ल्यात अतुलनीय धैर्य दाखवणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख डॉ. सदानंद दाते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कामा रुग्णालयातील ग्रेनेड हल्ल्यात गंभीर जखमी असूनही त्यांनी मागे न हटता अतिरेक्यांचा सामना केला आणि त्यांचा शेवट केला.

शांतीदूत म्हणून काम करत असलेल्या आणि समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच 26/11 हल्ल्यात अतुलनीय शौर्य दाखवणारे आणि ‘जिंदा शहीद’ म्हणून ओळखले जाणारे सुनिल जोधा यांनाही गौरवण्यात आले. श्री जोधा यांनी या हल्ल्यावेळी शरीरावर 20 गोळ्या झेलल्या ज्यातील एक आजही त्यांच्या शरीरात आहे.

या कार्यक्रमामध्ये पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनाही सन्मानित करण्यात आले तसेच 26/11 या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांनाही सन्मानित करण्यात आले.


परभणीः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अब्दुल माजिद यांच्या उपस्थीतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्यसभा खासदार डॉ फौजिया खान यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी मध्ये पक्षाची दिशा व पक्षा तर्फ उभे करण्यात येणारे उमेदवारांचे निवडी करीता कार्यक्रम जाहिर केला. खासदार डॉ फौजिया खान यांनी जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सध्या सुरु असलेल्या नगर परिषद निवडणुकीत सेलू येथे नगर अध्यक्ष व सदस्य पदाकरीता, तसेच जितुर, पुर्णा, गंगाखेड या नगर परिषद येथे सदस्य पदासाठी निवडणुक लढवित आहे. तर सोनपेठ येथे सहयोगी पक्षा तर्फे अधाडीत लढत आहेत असे सांगीतले. परभणी महानगर पालीका व जिल्हा परिषद पंचायत समिती चे आमामी निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
महानगर पालीकेच्या निवडणुकीमध्ये निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाचे शहर अध्यक्ष यांचेकडे दिनांक 23 नोव्हेंबर पासुन 4 डिसेंबर पर्यंत त्यांचे अर्ज व कागदपत्रे मुलाखतीसाठी सादर करावी असे जाहिर केले. या उमेदवारांचे अर्जा वरुन त्यांचे मुलाखती घेण्यात येईल आणि सुजान व सुसंस्कृत असलेले उमेदवार परभणी महानगर पालीकेमध्ये पक्षातर्फे उभे करण्यात येतील असे जाहिर केले. जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दिनांक 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या काळात पक्षाचे परभणी येथील राष्ट्रवादी भवन येथे जमा करण्याचे काम सुरु झाले आहे असे सांगीतले. आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड व त्यांच्या होत असलेल्या आत्महत्या या सरकारच्या उदासीन धोरणामुळे होत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा शेतकऱ्यां सोबत उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस परभणीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अब्दुल माजिद, पक्षाचे प्रदेश कार्यकारणीतील श्री दशरथ तुपसुंदर, रहेमान पठाण, अब्दुल खालीद, रामा आडे, वनिता चव्हाण मॅडम, तहसीन खान व इतर उपस्थित होते.

FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही.