April 19, 2026 3:06 pm

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात नवऱ्याने बायकोचा खून केला. त्यानंतर त्याने जे शक्कल लढवली ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. चला जाणून घेऊया पोलिसांचा घामटा काढणारे हे प्रकरण काय आहे…

नवरा-बायकोचे नाते हे अतिशय सुंदर असते. कधी प्रेम तर कधी भांडणे, तसेच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढउताराला ते एकत्र धीराने समोरे जातात. मात्र, याच नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने बायकोचा गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर त्याने बायकोच्या मृतदेहाची ज्या प्रकारे विलेवाट लावली ते पाहून पोलिसांनाही घाम फुटला. आता नेमकं प्रकरण काय चला जाणून घेऊया..

केरळमधील कोट्टायमच्या शांत खोऱ्यात एक भयानक कट रचला गेला, ज्याने सुंदर नात्यावरच घाव घालण्यात आला. कोट्टायममध्ये रचली गेलेली एक भयंकर कहाणी, ज्यामध्ये प्रेमाच्या जागी आता फक्त भयावह घटनेची दहशत आहे. खरेतर, वेगळे राहणाऱ्या ५९ वर्षीय टेक्नोलॉजी एक्सपर्ट सॅम जॉर्ज याने आपल्या पत्नी जेसीचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिचा मृतदेह खोल खड्ड्यात फेकून दिला. पोलिसांच्या मते, हा एक नियोजित खून होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे प्रकरण २६ सप्टेंबरचे आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात एक खळबळजनक खुनाची घटना घडली. आरोपी सॅम जॉर्ज (वय ५९) याने २६ सप्टेंबरच्या रात्री आपली पत्नी जेसी सॅम (वय ५०) हिचा घरातच गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह आपल्या कारच्या डिक्कीत ठेवला आणि रात्री १ वाजता तो ६० किलोमीटर दूर एका खोल खड्ड्यात फेकून दिला. खुनाचा पुरावा लपवण्यासाठी सॅमने जेसीचा मोबाइल फोनही खोल पाण्यात फेकून दिला.

सॅमची इराणी महिलेशी मैत्री

सॅमला एका इराणी महिला मैत्रिणीसोबत पाहिले गेले, जी एमजी विद्यापीठात योगाचे शिक्षण घेत आहे. असे सांगितले जाते की, सॅमने केवळ त्या इराणी मुलीशी मैत्री केली नाही, तर तिला एमजी विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदतही केली. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या इराणी मैत्रिणीला या योजनेबद्दल काहीच माहिती नव्हती आणि तिने या प्रकरणाच्या तथ्यांची पुष्टी करण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे मोबाइल पुरावे देखील दिले.

आरोपीने गुन्हा कबूल केला

जेसीचा मृतदेह शुक्रवारी सापडला आणि सॅमला ताब्यात घेण्यात आले. दोन दिवसांच्या कठीण शोधानंतर मंगळवारी खोल पाण्यातून मोबाइल फोन शोधून काढला. पोलिसांच्या चौकशीत सॅमने आपला गुन्हा कबूल केला. सॅमला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी बातमी समोर येत आहे, रशियानं आता मोठा निर्णय घेतला आहे, रशियानं भारताला मोठी ऑफर दिली आहे, हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Source : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव निर्माण करण्याची सध्या एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला, याचाच अर्थ आता अमेरिकेमध्ये भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ आकारण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. एवढंच नाही तर भारतानं आता रशियाकडून सुरू असलेल्या कच्च्या तेलाची आयात आणखी वाढवण्याची तयारी दाखवली आहे.

भारतानं रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करावं, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि ते पैसे रशिया हा युक्रेनसोबतच्या युद्धात फंड म्हणून उपयोग करतो असा आरोप अमेरिकेनं केला आहे. मात्र अमेरिकेकडून सुरू असलेल्या या आरोपांनंतर देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे, भारतानं घेतलेल्या या निर्णयाचा आता फायदा होताना दिसत आहे.

FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही.

Source : वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही. अशा परिस्थितीत आता तुम्हाला UPI द्वारे 1.25 पट टोल टॅक्स भरावा लागेल. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सध्या FASTag नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो.

समोर आलेल्या माहितीनुसार सध्या 98% टोल फास्टॅगद्वारे वसूल केले जातो. ज्या वाहनांचा फास्टॅग सक्रीय नसेल किंवा काम करत नसेल तर पूर्वी दुप्पट टोल भरावा लागत होता. मात्र आता युपीआयद्वारे 1.25 पट टोल भरावा लागणार आहे. तसेच जर तुमचा फास्टॅग सक्रीय असेल मात्क टोल प्लाझा मशीनमध्ये अडचण निर्माण झाल्यास तुम्ही फुकटात टोल ओलांडू शकता. तुम्हाला टोलवर थांबण्याची किंवा टोल भरण्याची गरज नाही.

वाहनचालकांचे पैसे वाचणार

तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला आता UPI द्वारे टोल शुल्काच्या फक्त 1.25 पट रक्कम भरावी लागेल. उदाहरणार्थ, जर टोल 100 रुपये असेल तर आणि तुमचा फास्टॅग काम करत नसेल तर तुम्हाला आधी रोख 200 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता केवळ UPI द्वारे 125 रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे 75 रुपयांची बचत होईल. तसेच टोल प्लाझावर रोखीने होणारे व्यवहार आणखी कमी होतील आणि भ्रष्टाचारही कमी होईल.

15 नोव्हेंबरपासून नियम लागू होणार

फास्टॅगचा हा नवा नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. तोपर्यंत अतिरिक्त दंड टाळण्यासाठी तुमच्या वाहनाचा FASTag तपासा आणि तो सक्रीय आहे याची खात्री करा. जर काही समस्या असेल तर ती दुरुस्त करा. यामुळे तुमचा प्रवास कमी पैशांमध्ये होईल.

टोल संकलनात वाढ

ऑगस्टमध्ये 7052.91 कोटी रुपयांचे टोल संकलन झाले होते. ही रक्कम मागील वर्षीच्या 5610.64 कोटींपेक्षा 26 टक्क्यांनी जास्त आहे. य़ाआधी मे 2025 मध्ये सर्वाधिक 7087.16 कोटींचा टोल वसूल झाला होता. जूनमध्ये हा आकडा 6700 कोटी रुपये होता. जुलैमध्ये 6500 कोटी रुपयांचा टोल जमा झाला होता.

मुंबई, दि. ९ : वीज कर्मचाऱ्यांच्या २९ पैकी सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीने गुरुवार (दि. ९) पासून सुरू केलेल्या ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यभरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. या संपामध्ये महावितरणमधील ६२ टक्के अभियंते, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले नाहीत.

वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत व सकारात्मक भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. त्याचे लेखी इतिवृत्तही संयुक्त कृती समितीला देण्यात आले आहे. तरीही ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाला सुरुवात करण्यात आली आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम’ म्हणजेच ‘मेस्मा’ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय संप काळासाठी महावितरणकडून आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली आहे. महावितरणमध्ये गुरूवारी (दि. ९) सुमारे ६२ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यासोबतच २० हजार तांत्रिक बाह्यस्त्रोत कर्मचारी (यंत्रचालक व विद्युत सहायक) कार्यरत आहेत. संपकाळात प्रामुख्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मुंबई येथील मुख्यालयात मुख्य अभियंता यांच्या नियंत्रणात आपत्कालीन नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाद्वारे राज्यभरातील वीजपुरवठ्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व साधनसामग्रीचे नियोजन करण्यात येत आहे. यासह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याद्वारे राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येत आहे.

संपकाळातील नियोजनानुसार पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. यात संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, २० हजार बाह्य स्त्रोत तांत्रिक कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे.

संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दर्जेदार साहित्यिक, सांगितीक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यास रंगत

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीला ५० वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी डोम येथे ६ ते ८ ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन, पत्रकार, कवी, लेखक यांना पुरस्कार प्रदान, सुफी संगीत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अद्ययावत उर्दू घर उभारणार – अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे

या सोहळ्याचे उद्घाटन अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, मराठी व उर्दू साहित्यिक देवाण घेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे ‘उर्दू घर योजना’ आहे. ही योजना अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळा, वसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मुंबई, दि. ९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  येथून विमानाने सायं ५.१५ वाजता दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, अमित साटम, अॅड. पराग आळवणी, मुरजी पटेल, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव राजेश कुमार, पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.